पाच ग्रामपंचायतीच्या एकत्रीत समावेशासह दि. १२ जून १९८५ रोजी मिरा भाईंदर नगरपालिकेची स्थापना झाली त्यानंतर २३ जानेवारी १९९० रोजी राईमुर्धे, डोंगरी, उत्तन व वर्सोवा या चार ग्रामपंचायतीचा समावेश झाला. या नगरपालिकेच्या सभोवताली दहिसर चेकनाक्यापासुन थेट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची वनराई, घोडबंदर किल्ला, वसईची खाडी, उत्तन, गोराई बिच असा एकुण ७९.४० चौ.कि.मी. एवढ्या क्षेत्रफळात निसर्ग सो॑दर्याने संपन्न असलेले शहर म्हणजे मिरा भाईंदर शहर. लोकसंख्या वाढीनुसार दि. २८ फेब्रुवारी २००२ रोजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले, मिरा भाईंदर शहराची सन २०११ च्या जनगणनेनुसार एकुण लोकसंख्या ८,०९,३७८ एवढी असुन दिवसेंदिवस जसजसा शहराचा विकास होत आहे त्याप्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. ज्याप्रमाणात शहराचा विकास होत आहे त्याचे दुप्पट प्रमाणात शहराची लोकसंख्या जवळजवळ वाढत असल्याने महानगरपालिकेजवळ उपलब्ध असलेल्या नागरी सेवा सुविधांवर त्याचा ताण पडत आहे. त्यामुळे काही वेळा नागरी सुविधा पुरविणे प्रशासनास अडचणीचे होत असले तरी महानगरपालिका नागरीकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे.
दि. २८ फेब्रुवारी २००२ रोजी महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीं मधुन प्रथम महापो॑र म्हणुन सौ. मायरा गिल्बर्ट मेंडोसा व उपमहापो॑र श्री. मुझफ्फर हुसैन हे निवडून आले तद्नंतर सन २००७, २०१२ व २०१७ मध्ये महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडलेल्या आहेत. सद्यस्थितीत श्रीम. ज्योत्स्ना हसनाळे यांची अनु. जातीसाठी राखीव असलेल्या कोट्यातुन महापो॑र पदी निवड झाली आहे. तर उपमहापो॑र श्री. हसमुख गेहलोत यांची निवड झाली आहे.
तसेच महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासुन महानगरपालिकेचे पहिले आयुक्त श्री. शिवमुर्ती नाईक यांनी कामकाज पाहिले असुन सद्यस्थितीत डॉ. विजय राठोड, (भा.प्र.से.) हे आयुक्त आहेत.